ओबीसींच्या पाठींब्यानेच भाजपला यश- खडसेंचे प्रतिपादन ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । देशात दोन खासदार तर राज्यात चौदा आमदारांपासून सत्तेपर्यंतच्या वाटचालीत भाजपला ओबीसी समुदायाकडून मिळालेला पाठींबा महत्वाचा ठरला असल्याचे सांगून आपण राज्यातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना पक्षापर्यंत पोहचवल्याचे प्रतिपादन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. ते कोअर समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

कोअर समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. खडसे म्हणाले की, ओबीसी नेतृत्वावर अन्याय झाला हे आपण कधीही बोललेलो नाही. तर ओबीसींना अलीकडे डावलले जात असल्याची राज्यातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्याकडे बोलत असून हीच भावना आपण पक्षापर्यंत पोहचवली आहे. आपण पक्षासाठी अगदी हमालीसारखी मेहनत केली असून याचे आपल्याला फळदेखील मिळाल्याचे नाकारत नाही. तथापि, अगदी गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनाही वेळोवेळी कशा प्रकारे त्रास देण्यात आला हे जगासमोर आहे. इतरांना संधी देण्यासाठी पक्ष वाढीसाठी मेहनत करणार्‍यांना टार्गेट करण्यात येत असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करून आपण हेच म्हणत असल्याची पुष्टीदेखील खडसे यांनी जोडली.

पहा : ओबीसींबाबत एकनाथराव खडसे नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/vb.508992935887325/3047245698636130

Protected Content