शिवसेनेच्या आमदारांचे अमृता फडणविसांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई प्रतिनिधी । आदित्य ठाकरे यांनी वडिल मुख्यमंत्री झाल्यानंतर गायनाचे नव्हे तर जनतेचे छंद जोपासल्याचे नमूद करत शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी अमृता फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही बांगड्या भरल्या नसल्याचे वक्तव्य केले होते. यावर आदित्य ठाकरे यांनी बांगड्या घालणार्‍या या सक्षम असून फडणवीस यांनी याबाबतची मानसिकता बदलावी असा टोला मारला होता. वक्तव्यांच्या या लढाईत अमृता फडणवीस यांनी उडी घेत ट्विटरवरून आदित्य ठाकरे यांना रेशमी कीडा संबोधून त्यांच्यावर टीका केली होती. ”रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन रेशमी आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते”, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

अमृता फडणवीस यांच्या या टीकेला शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ”आदित्य ठाकरे हे प्रबोधनकार, बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा वारसा लाभलेलं व्यक्तिमत्त्व आहे. वडील मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी (गायनाचे) छंद पूर्ण केले नाहीत. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्याचा छंद जोपासला आहे”, असं कायंदे यांनी म्हटलं आहे.

Protected Content