चौकशी केल्यास सत्य समोर येणारच-एकनाथराव खडसे

khadse e1550572684596

जळगाव प्रतिनिधी । आपला फोन टॅप झाल्याबाबतच्या वृत्तातील दाव्याबाबत आजच काही सांगता येणार नसले तरी प्रकरण चौकशीला दिले असल्यास यातून जे सत्य असेल ते समोर येईलच अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजसोबत बोलतांना दिली आहे.

फ्री प्रेस जर्नल या वतमानपत्राने आज फोन टॅपींग प्रकरणी गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. या वृत्तपत्राने दिलेल्या खास वृत्तामध्ये फडणवीस सरकारच्या कालखंडात विरोधी पक्षातील नेत्यांसोबत भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा फोनदेखील टॅप झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले असतांना हा गौप्यस्फोट खळबळ उडवणारा ठरला आहे.

या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने एकनाथराव खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, फोन टॅप झाल्याच्या दाव्याबाबत आजच काहीही सांगता येणार नाही. तथापि, या प्रकरणी चौकशी झाल्यास सत्य समोर येण्याची शक्यता असल्याचे नाथाभाऊ म्हणाले. दरम्यान, खडसे यांच्याबाबत करण्यात आलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Protected Content