अमळनेरात दोन गटांमध्ये राडा : दगडफेकीनंतर संचारबंदी !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात काल रात्री उशीरा दोन गटांमध्ये जोरदार संघर्ष झाला असून तुफान दगडफेक करण्यात आल्यानंतर पोलीस प्रशासनाने कलम-१४४ लावले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहरातील जिनगर गल्ली आणि सराफ बाजारासह परिसराद दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. याप्रसंगी जोरदार दगडफेक करण्यात आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने वातावरण नियंत्रणात आले. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू होती. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून वातावरण तणावपूर्ण पण पूर्णपणे नियंत्रणात आहे.

दरम्यान, अमळनेर शहरातील तणावाचे वातावरण लक्षात घेता, उपविभागीय अधिकारी कैलास कडलक यांनी आज म्हणजेच दिनांक १० रोजी सकाळी ११ वाजेपासून ते दिनांक १२ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी लागू असणार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content