सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने केले असं काही.. नातेवाईकांचा आरोप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुलबाळ होत नाही म्हणून सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपविल्याची खळबळजनक घटना गुरूवारी ६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ममता शंकर भील (वय-२३) रा. मन्यारखेडा ता.जि.जळगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे.

भुसावळ तालुक्यातील जुगलखोरी येथील माहेर असलेल्या ममता शंकर भील यांच्या विवाह जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथील शंकर सुरेश भील यांच्याशी तीन वर्षांपुर्वी झालेला आहे. सासरी पती, सासरे, सासू आणि नणंद यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. गुरूवार ६ जुलै रोजी घरी कुणीही नसतांना राहत्या घरात विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार सायंकाळी ५ वाजता उघडकीला आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि राजेंद्र साळुंखे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, विवाहितेला मुलबाळ होत नाही म्हणून तिचा गेल्या तीन वर्षांपासून छळ सुरू होता. तसेच त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोपी मयत विवाहितेच वडील अर्जून एकनाथ भिल यांच्या नातेवाईकांनी केला आहे. पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याघटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content