घाण निघून गेलीये; आता चांगलं काय तरी आपण घडू शकू – आदित्य ठाकरे

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “घाण निघून गेली. आता चांगलं काय तरी आपण घडू शकू. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि कचरा बाजूला करण्याचं काम झालं आहे.” असं शिवसेना नेते आदित्य ठाकरे कर्जत येथे आयोजित कार्यक्रमात बंडखोर आमदारांना उद्देशून म्हणाले.

यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना महाराष्ट्रात जिथे-जिथे मी जात आहे, तिथे प्रत्येक शिवसैनिक ही परिस्थिती संकट म्हणून नाही तर संधी म्हणून बघत असल्याचे त्यानी सांगितले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, आहे की, बंड करत आमदार फसले असून गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांची अवस्था त्यांची कैद्यासारखी झाली असल्याची टीका करत दादागिरीने तुम्ही मन नाही जिंकू शकत असे त्यांनी बंडखोर आमदारांना उद्देशून सांगितले.

Protected Content