कर्जबाजारीतून वृध्द शेतकऱ्यानं केलं असं काही…नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील पाथरी गावातील ६५ वर्षीय वृध्द शेतकऱ्याने कर्जबाजारीतून शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भागवत दगडू पाटील (वय ६५) रा. पाथरी ता.जळगाव असे मयत वृध्द शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील पाथरी येथे भागवत पाटील हे वास्तव्या असून त्यांची गावालगतच भावासोबत सामाईक शेती आहे. शेती करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. शेतीसाठी त्यांनी हातउसनवारीने पैसे घेतले होते, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते चिंतेत होते. दरम्यान, बुधवारी ३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास ते आपल्यात शेतात गेले. काही वेळ त्याठिकाणी थांबल्यानंतर ते त्यालाच लागून असलेल्या भावाच्या शेतातमध्ये गेले. याठिकाणी कडूलिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत भागवत पाटील यांनी आपली जीवनयात्रा संपवली. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या भागवत पाटील यांचा पुतण्या झाडाजवळ आला असता, त्याला काकांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने घटनेची माहिती लागलीच आपल्या भावांना दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला. घटनेची माहिती पोलीस पाटील संजीव लंगरे यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी हेमंत पाटील व प्रदिप पाटील यांनी लागलीच त्याठिकाणी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Protected Content