रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन सख्खे भाऊ ठार झाले असून हा अपघात कर्जोत गावाजवळ महामार्गावर घडला.
या संदर्भातील वृत्त असे की, अंकलेश्वर ते बर्हाणपूर महामार्गावरआज भीषण अपघात झाला असुन यात मजूरीचे काम करणारे दोघे सख्खे भाऊ ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. खंडवा(मध्य प्रदेश ) येथील एक परीवार कर्जोत (ता. रावेर) नजिक कामा निमित्त आला होता.अत्यंत अठरा विश्वदारिद्र असणार्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.
मयत झालेले सुनिल नारायण हरिजन (वय ३५) आणि अनिल नारायण हरिजन ( वय २३ ) हे या भीषण अपघातात ठार झाले असून दोघांचे लग्न झाले आहे त्यांना मुले देखिल आजे. दोघांचे वडील भिक्षा मांगुन आपला जिवन चारिथार्त चालवत होते.
दरम्यान, अपघाताची माहीती मिळताच पोलिस ग्रामीण रुग्णालयात पोहचले असुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तर या भीषण अपघातात गरिब कुटुंबावर काळाचा घाला आल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.