अर्थव्यवस्था ४० वर्षांमध्ये पहिल्यांदाच मंदीमध्ये- राहूल गांधी

नवी दिल्ली वृत्तसंस्था। देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेयर करत पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भारतीय अर्थव्यवस्था ४० वर्षांमध्ये पहिल्यांदाच मंदीमध्ये पोहोचली असल्याचा आरोप करत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेयर करत पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ३ मिनिटे ३८ सेकंदाच्या या व्हिडिओत राहुल गांधी म्हणतात, मसंपूर्ण देश सामना करत असलेल्या आर्थिक समस्येबाबतचे सत्य आज स्पष्ट होणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था ४० वर्षांमध्ये पहिल्यांदाच मंदीमध्ये पोहोचली आहे. असत्याग्रही याचा दोष देवाला देत आहेत. सत्य काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ पाहा.फ

व्हिडिओत राहुल गांधी म्हणतात, भारतीय जनता पक्षाने देशातील असंघटीत अर्थव्यवस्थेवर आक्रमण केले आहे आणि तुम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सन २००८ मध्ये मोठे आर्थिक वादळ जगात आले. अमेरिकेत, जपानमध्ये, चीनमध्ये, सगळीकडे आले. अमेरिकेच्या बँका कोसळल्या, कंपन्या बंद झाल्या, एकानंतर एक, बंद होण्यासाठी कंपन्यांची रांग लागली. युरोपमधील बँका कोसळल्या, मात्र भारताला काहीही झाले नाही. यूपीएचे सरकार होते. मला थोडे आश्‍चर्य वाटले. मी पंतप्रधानांकडे गेलो आणि विचारले, मनोमोहनजी, तुम्ही हे जाणता, हे सांगा की संपूर्ण जगात आर्थिक नुकसान झाले आहे, मात्र भारतात काहीही परिणाम झाला नाही, कारण काय आहे?

राहुल गांधी पुढे म्हणतात, ममनमोहन सिंह यांनी सांगितले की, तुम्हाला भारताच्या अर्थव्यवस्थेला समजून घ्यायचे असेल, तर भारतात दोन प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत हे समजून घ्यावे लागेल. पहिली असंघटित अर्थव्यवस्था आणि दुसरी संघटित अर्थव्यवस्था. संघटित अर्थव्यवस्थेतील मोठ्या कंपन्यांची नावे तुम्हाला माहीत आहेत. असंघटित व्यवस्थेत शेतकरी, मजूर, छोटे दुकानदार, मध्यम आकाराच्या कंपन्या. ज्या दिवसापर्यंत भारतातील असंघटित व्यवस्था मजबूत आहे, त्या दिवसापर्यंत भारताला कोणतेही आर्थिक वादळ स्पर्श करू शकत नाही. आता आजच्या दिवसावर येऊ या, गेल्या ६ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने असंघटित अर्थव्यवस्थेवर आक्रमण केले आहे.फ

राहुल गांधी पुढे म्हणतात, तीन उदाहरणे तर मी तुम्हाला आताच देतो. नोटाबंदी, चुकीची जीएसटी आणि लॉकडाउन. लॉकडाउनच्या मागे विचार नव्हता असा विचार तुम्ही करू नका. शेवटच्या मिनिटाला लॉकडाउन घोषित केले गेले, असाही तुम्ही विचार करू नका. या तिन्हींचा उद्देश आमचे इन्फॉर्मल सेक्टर संपवून टाकणे हा आहे. पंतप्रधानांना जर सरकार चालवायचे असेल, मीडियाची आवश्यकता आहे, मार्केटिंगची आवश्यकता आहे, मीडिया आणि मार्केटिंग १५-२० लोक करतात. इन्फॉर्मल सेक्टरमघ्ये पैसा आहे, लाखो-कोट्यवधी पैसे, ज्यांना हे लोक स्पर्श करू शकत नाहीत. शेतकर्‍यांच्या घरात, मजुरांकडे, छोट्या व्यापार्‍यांकडे, दुकानदारांकडे लाखो-कोटी रुपये आहेत. या लोकांना हे तोडायचे आहे, पैसा घ्यायचा आहे.

राहुल पुढे म्हणाले की, मयाचा परिणाम जाणवणार, परिणाम हा होईल की भारत देश रोजगार निर्मिती करू शकणार नाही. का?, कारण इन्फॉर्मल सेक्टर ९० टक्क्यांहून अधिक रोजगार देते. ज्या दिवशी इन्फॉर्मल सेक्टर नष्ट होईल, त्या दिवशी भारत रोजगार निर्मिती करू शकणार नाही. तुम्हीच हा देश चालवता. तुम्हीच या देशाला पुढे घेऊन जाता आणि तुमच्याच विरोधात कट रचला जात आहे. तुम्हाला फसवले जात आहे आणि तुम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्हाला हे आक्रमण ओळखता आले पाहिजे आणि संपूर्ण देशाने एकत्र येऊन याच्या विरोधात लढले पाहिजे.

Protected Content