खडसेंच्या भितीने ‘ते’ सहा महिने बाहेर ! : मुख्यमंत्र्यांनी सांगितला किस्सा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात आधी शिवसेनेचे सरकार असले तरी शिवसैनिकांवर खोट्या केसेस होत होत्या असे सांगतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरातील किस्सा सांगितला.

आज एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्‍वासदर्शक ठराव संमत केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर आभार प्रदर्शनाचे भाषण केले. यात त्यांनी आधीचे सरकार हे कथितरित्या शिवसेनेचे असले तरी राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत होते. काही जणांच्या तडीपार्‍या करण्यात आल्या. मात्र त्यांची दाद घेण्यात आली नाही. यासाठी त्यांनी मुक्ताईनगरसे आमदार चंद्रकांत पाटील यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, मुक्ताईनगरा शिवसेना उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख हे खडसेंच्या दहशतीमुळे दाखल झालेल्या केसेसमुळे सहा महिने बाहेर लपून बसले होते. त्यांना मी धीर देत आता आपले सरकार आले असल्याने कुणाला घाबरू नका अस सांगितल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार एकनाथराव खडसे यांच्यातील राजकीय शत्रुत्व हे जगजाहीर आहे. दोन्ही गटांमधील धुम्मस ही अनेकदा पोलीस स्थानकापर्यंत गेलेली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज यावर विधानसभेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

Protected Content