…होय चीनने भारतात घुसखोरी केलीय- राहूल गांधी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंतप्रधानांनी चीनी सैन्य भारतीय हद्दीत आले नसल्याचा दावा केला नसतांनाच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ शेअर करून चीन्यांनी भारतीय जमीन बळकावली असल्याचा दावा केला आहे.

काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी हे सातत्याने पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रखर टीका करत आहेत. या अनुषंगाने त्यांनी आज एखा ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. यात त्यांनी आज तक या वृत्तवाहिनीच्या एका विशेष वृत्तांताचा व्हिडीओ शेअर केला आहे. पंतप्रधानांनी काहीही दावा केला असता तरी चीनी सैन्य भारताच्या हद्दीत शिरले असून त्यांनी आपल्या भूमिवर कब्जा केल्याचे दिसून येत असल्याचा दावा राहूल गांधी यांनी या ट्विटमध्ये केला आहे. आज सकाळी देखील त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे.

Protected Content