शूर न्यायमूर्ती लोया यांची आठवण येतेय- राहूल गांधींचे सूचक ट्विट

नवी दिल्ली । न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्या आकस्मीक बदलीवरून काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी शूर न्यायमूर्ती लोया यांची आठवण येत असल्याचे केलेले ट्विट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांनी दिल्ली पोलिसांना फटकारले होते. तसेच भाजपाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेशही दिले होते. त्यानंतर न्यायमूर्ती मुरलीधर यांची बदली झाल्यानं राजकीय विरोधकांनी केंद्र सरकारला निशाणा बनवले आहे. कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावरून न्यायमूर्ती लोया यांच्या हत्येचा विषयावरून ट्विट केलं आहे. यात म्हटले आहे की, ”शूर न्यायमूर्ती लोया यांची आठवण येत आहे, ज्यांची बदली झाली नव्हती.”

न्यायमूर्ती लोया यांचा अतिशय संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला असून नेमक्या याच विषयावरून राहूल गांधी यांनी केलेले ट्विट हे सूचक मानले जात आहे.

Protected Content