लॉकडाउनच्या काळात २२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील दीड वर्षात ७५ हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा झाला आहे. त्यातले २२ हजार कोटी रुपये हे लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

 

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी पीएम-किसान योजने अंतर्गत विविध घोषणा केल्या. तर साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रुपाने १७ हजार कोटी रुपये जमा करताना मला आनंद होतो आहे, असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राच्या पायाभूत सेवा सुविधांसाठीच्या आर्थिक तरतुदींची घोषणा केली. शेतकरी समित्या, एफपीओ,एस  यांना गोदामं तयार करण्यासाठी, कोल्ड स्टोअरेज उभारण्यासाठी, फूड प्रोसेसिंग उद्योगांसाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याआधी ई-एनएएमद्वारे एक उत्कृष्ट व्यवस्था तयार करण्यात आली आहे. आता कायदा तयार करून शेतकऱ्याला बाजाराच्या वर्तुळातून आणि बाजाराला कराच्या वर्तुळातून मुक्त केले जाईल. या निर्णयामुळे शेतकरी त्याच्या शेतात येणाऱ्या उत्पादनांचा थेट सौदा करु शकतो, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

Protected Content