राज्य लोकसेवा आयोगाची आता मदत केंद्राची सुविधा

 

मुंबई : वृत्तसंस्था । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण अडचणी/शंका निवारणासाठी  १८००-१२३४-२७५ आणि १८००-२६७३-८८९ या टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्र(हेल्प डेस्क/कॉल सेंटर)ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

या टोल फ्री क्रमांकावर सद्यस्थितीत ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण स्वरुपाच्या अडचणी/शंकाचे निवारण होईल.  ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या अनुषंगाने तांत्रिक/सर्वसाधारण पात्रता अथवा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबतच्या अडचणींचे निवारण देखील केले जाणार आहे.

 

 

टोल फ्री क्रमांकावर प्राप्त होणारे दूरध्वनी संभाषणाचे आयोगाच्या कार्यालयाकडून संनियंत्रण व विश्लेषण केले जाणार आहे.

 

हे टोल फ्री क्रमांक २ मार्च २०२१ पासून सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते रात्री ८ आणि शनिवार व रविवारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० कार्यान्वित राहणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आलेले आहे. टोल फ्री क्रमांकाच्या सुविधेव्यतिरिक्त उमेदवारांना [email protected] या ईमेल आयडीवर तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने संपर्क साधता येणार आहे.

Protected Content