या दोन नेत्यांवर भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आणण्याची जबाबदारी?

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीची व्यूहरचनाभाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना आखण्यात येत असल्याचे वृत्त आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी राज्यात एक मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असून गयारामांना प्रवेश देण्याची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर असणार आहे.

 

 

भाजपमध्ये गेलेल्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचना आखली आहे. शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बुधवारी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत नेत्यांच्या घरवापसीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षाचे राजकारण, पक्षाची ताकद पाहून गयारामांना पुन्हा प्रवेश दिला जाणार असल्याचे चर्चा आहे. राष्ट्रवादीतील गयारामांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याची जबाबदारी शरद पवारांकडून अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. लवकरच राष्ट्रवादीत काही भाजप आमदारांच्या प्रवेश करून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदारांना पुन्हा पक्षात घेताना राष्ट्रवादीकडून शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेतले जाईल, असेही बोलले जात आहे.

Protected Content