भाजपने महानंदची वाट लावली- ना. सुनील केदार

जळगाव प्रतिनिधी । भाजपने महानंदाची वाट लावली असून महानंदासह राज्यातील इतर दुध संघ, सोसायट्यांच्या बळकटीकरणासाठी लवकरच धोरण निश्‍चीत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.

अजिंठा विश्रामगृहात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील पशुधन, दुध उत्पादक संस्था, सहकारी व खासगी दुध संघांची माहिती घेतली या वेळी ना. केदार म्हणाले की, शेतकर्‍यांना खात्रीशीर नगदी उत्पन्न देणारे माध्यम म्हणून दुग्ध व्यवसाय आहे. उत्पादित दुधाला शाश्‍वत बाजारभाव देण्यासाठी सहकारी संघ व राज्यातील संघांची मुख्य संस्था महानंदा असताना संस्थेच्या चेअरमन असलेल्या मंदाकिनी खडसे यांनी त्यात राजकारण केले असल्याचा आरोप त्यांनी केला.दरम्यान, आपल्याला राजकारणात न जाता. महानंदांची पुनर्बांधणी करायची आहे. संस्थेच्या भल्यासाठी नाही तर सामान्य दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या भल्यासाठी करायचे असल्याचेही केदार यांनी या वेळी स्पष्ट केले.

Protected Content