जळगाव प्रतिनिधी । भाजपकडून केवळ सत्ता चालवण्यासाठी महात्मा गांधींचे नाव घेतले जात असल्याचा आरोप दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी केला. ते येथील काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
दुग्ध विकास मंत्री ना. सुनील केदार हे जिल्हा दौर्यावर आले असतांना त्यांच्या उपस्थितीत येथील काँग्रेस भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महात्मा गांधी यांना वंदन करण्यात आले. ना. केदार म्हणाले की, भाजप सरकारने केवळ वर्धा विकास आराखडा केला; परंतु त्यावर काम केले नाही. प्रत्यक्ष काम करण्यास आपण प्रारंभ केल्याचे ते म्हणाले. भाजपला सत्ता राबवण्यासाठी गांधी हवे असले तरी ते प्रत्यक्षात नथुरामाचे अनुयायी असल्याची टीका त्यांनी केली.
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, प्रदेश सचिव डी.जी. पाटील, डॉ. ए. जी. भंगाळे, अॅड. अविनाश भालेराव, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, राजस कोतवाल, रावेरचे बाजार समिती सभापती राजीव पाटील, प्रमोद पाटील आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.