पाकने जिंकला टॉस : भारताला पहिल्यांदा फलंदाजी

मँचेस्टर वृत्तसंस्था । विश्‍वचषकातील सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असून भारताला फलंदाजी करायची आहे.

आज विश्‍वचषकातील सर्वात उत्सुकता लागून असणारा सामना होत आहे. यात भारत आणि पाकिस्ताने हे पारंपरीक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नाणेफेक जिंकून पाकने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेतल्यामुळे भारताला पहिल्यांदा बॅटींग करावी लागणार आहे. या सामन्यात जखमी शिखर धवनच्या जागी विजय शंकरला संधी मिळाली आहे. दरम्यान, सामन्यावर पावसाचे सावट असल्याने चाहत्यांची धाकधुक वाढली आहे.

Protected Content