नाटकाची नाहीतर सहकार्याची गरज ; विवेक नरवाडे

भुसावळ, प्रतिनिधी । भाजपच्या माझे अंगण माझे रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलनांवर जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी टिका केली आहे.

राज्यातील कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात महा विकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने  माझे अंगण माझे रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलनाची हाक दिली. भाजपचे आंदोलन म्हणजे एक प्रकारचे नाटक असून राज्याला या नाटकाची नाही तर सहकार्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया विवेक नरवडे यांनी दिली आहे. भाजपचे आंदोलन म्हणजे एक प्रकारचे रात्रंदिवस काम करून करून त्यांचा अपमान आहे असेही त्यांनी म्हटले आहे राज्यात गोंधळ निर्माण करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Protected Content