टी-२० वर्ल्ड कप: भारताचा श्रीलंकेवर धमाकेदार विजय

मेलबर्न (वृत्तसंस्था) भारतीय महिलांच्या क्रिकेट संघाने ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने धमाकेदार विजय मिळविला आहे.

 

सेहवाग शफाली वर्माच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील सलग चौथ्या विजयाची नोंद केली. भारताने ए ग्रुपमधील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेवर ७ विकेट आणि ३२ चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत लंकने भारताला ११४ धावांचे आव्हान दिले होते. या विजयासह भारताने ग्रुपमध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. चार विकेट घेणाऱ्या राधा यादवला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण त्यांचा तो निर्णय पूर्णपणे चुकला.

Protected Content