जिल्ह्यातील चार बाजार समित्या बंद ठेवण्याचे आदेश

जळगाव प्रतिनिधी । सोशल डिस्टन्सींगचे पालन होत नसल्यामुळे जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कारभार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याने
जळगाव शहर, अमळनेर , भुसावळ आणि चाळीसगाव येथील बाजार समित्यांचे व्यवहार पुढील आदेशापर्यत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे. बाजार समित्यांमधील गर्दी कमी होत नसल्याने हे आदेश दिल्याचे मानले जात आहे.

Protected Content