मुंबई (वृत्तसंस्थ) एरवी आम्हाला तत्वज्ञान शिकवणाऱ्यांनी नवीन सरकार येऊन १०० दिवस उलटल्यानंतरही गेल्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी आपले बंगले सोडले नसल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केली आहे. त्या रोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात बोलत होत्या.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्यात की, सरकार येऊन १०० दिवस झाले पण आम्हाला तत्वज्ञान शिकवणारे बंगले सोडायला तयार नाही, त्यामुळे आमच्या मंत्र्यांना बंगलेच मिळत नसल्याचे सांगितले. भाजपा सरकारच्या काळात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मलबार हिल येथील देवगिरी बंगला राहण्यासाठी दिला होता. नवीन सरकार आल्यापासून १०० दिवस झाले तरी मुनगंटीवारांनी अद्याप देवगिरी बंगला रिकामा केलेला नाही.