उद्या धरणगावात गायरान वाचविण्यासाठी मूकमोर्चा

धरणगाव प्रतिनिधी | येथील अमळनेर रोडवर असलेल्या शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण काढण्याचे जिल्हाधिकारी आदेश देवून देखील तहसीलदार व मुख्याधिकारी कारवाई करत नसल्याने गायरान बचाव मंचतर्फे उद्या बुधवार ८ डिसेंबर रोजी मुकमोर्चा काढण्यात येणार आहे. यास भारतीय जनता पार्टीने पाठिंबा जाहीर केला आहे.

 

धरणगावातील अमळनेर रोडवर असलेल्या शासकीय गायरान जमिनीवर अनधिकृत बांधकाम करून शासकीय गायरान जमीन बळकावण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करीत आहे. त्याठिकाणावरील बेकायदेशीर बांधकामा विरोधात तक्रार केली असता जिल्हाधिकारी यांनी सदर अतिक्रमित बांधकाम काढून टाकण्याचे आदेश दिलेले असतांना देखील धरणगाव तालुक्याचे तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी आदेशाची अंमलबजावणी आतापर्यंत केलेली नाही. सदर अतिक्रमणामुळे गुरांना चरण्यास जागा शिल्लक राहणार नाही त्यामुळे पशुधन पालक व शेतकरी बांधावांची मोठया प्रमाणात गैरसोय होईल. कारण शहरालगत एकमेव गायरान जागा आहे म्हणून गायरान बचाव मंचच्या वतीने मुकमोर्चा उद्या बुधवार दि.८ डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता बालाजी मंदिरापासून हा मूक मोर्चास प्रारंभ होणार असून शेतकरी हितासाठी निघत असलेल्या मूकमोर्चास भारतीय जनता पार्टीचा जाहीर पाठींबा दिला आहे. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने मुकमोर्चात सहभागी होतील, असे आशयाचे पत्र आज भारतीय जनता पार्टीने गायरान बचाव मंचचे संयोजक अमोल महाजन,सहसंयोजक अॅड.राहूल पारेख, शिरिषआप्पा बयस इत्यादी कडे दिले. याप्रसंगी ओबीसी जिल्हाध्यक्ष अॅड.संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, अॅड.वसंतराव भोलाने, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, जुलाल महाजन, राजू महाजन, कन्हैया रायपूरकर, टोनी महाजन, अनिल महाजन, निलेश महाजन, विक्की महाजन आदी पस्थित होते.

Protected Content