विजेच्या धक्क्याने तरूणाचा जागीच मृत्यू; जलशुध्दीकेंद्रातील घटना

जळगाव प्रतिनिधी । विजेच्या जोरदार धक्का लागल्याने भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथील तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजता उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

प्रमोद रमेश धनगर (वय-२५) रा. खंडाळा ता. भुसावळ असे मयत तरूणाचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, प्रमोद धनगर हा गेल्या महिन्याभरापासून तालुक्यातील उमाळा येथील महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रावर ठेकेदाराकडे स्वच्छता करण्यासाठी काम करतो. आज १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जलशुध्दीकरणाती टाक्याचे स्वच्छतेचे काम सुरू होते. यावेळी क्रेनच्या मदतीने टाक्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरू होते. इलेक्ट्रिक वायर कट झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का प्रमोद धनगर यांना बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी हर्षदा, आई द्रौपताबाई, प्रकाश व आनंदा हे दोन भाऊ आणि दोन विवाहित बहिण असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. अतुल पाटील करीत आहे. 

 

Protected Content