यावल प्रतिनिधी । येथील धोबीवाडा परिसरातील तेरा वर्षाच्या मुलीचा उत्तरप्रदेशात शोध लागला असून तिला घेऊन पोलीस यावलकडे येण्यासाठी निघाले आहेत.
याबाबत वृत्त असे की, येथील धोबीवाडा परिसरात राहणार्या व मागील दीड वर्षापुर्वी शाळेतुन अपहरण करण्यात आलेल्या १३वर्षीय मुलीला उत्तर प्रदेश सारख्या राज्यातुन शोधुन ताब्यात घेण्यात यावल पोलीसांना अखेर यश मिळाले आहे. या संदर्भात पोलीसात भिमसिंग कोळी यांनी आपल्या मुलीची मुलगी ट्विंकल कोळी हीचे १९नोव्हेंबर २०१९ रोजी ति शिकत असलेल्या शाळेतुन एका अज्ञात व्याक्तीव्दारे रिक्शात बसवुन तिचे अपहरण करण्यात आले असल्याची तक्रार दिली होती. याच काळात तिची आई मनिषा कोळी ही देखील सुप्रिम कॉलनी जळगाव येथे राहात असतांना तिचा शोध घेतला असता ती देखील मिळुन आली नाही.
दरम्यान भिमसिंग गंगाराम कोळी यांनी सर्वत्र आपली मुलगी मनीषा कोळी आणि नात ट्विंकल यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मिळुन आल्या नसल्याने निराश झालेल्या आजोबांनी त्या नातीचा व त्यांची मुलगी हिचा अखेर शोध थांबविला होता. मात्र दीड वर्षानंतर अचानक ट्विंकल कोळी हिचा दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजता आजोबांना फोन आला आणी तिने आपण कुठ आहे ही सर्व माहीती आजोबांना दिली.
त्यानंतर भीमसिंग कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्या मुलीच्या शोध कार्यासाठी पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणी सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे या दोन सदस्यांच्या पथकास गोरखपुर उतरप्रदेश येथे पाठविले होत. या दोन्ही पोलीसांनी उत्तर प्रदेशच्या तहसील बडहलगंज जिल्हा गोरखपुर येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी बच्चा यादव, पोलीस कर्मचारी सुशीलकुमार यादव आणी गृहरक्षक दलाचे प्रदुमल कुमार या पोलीसांच्या मदतीने त्या अपहरण करण्यात आलेल्या मुलीचा सुखरूप शोध लावण्यात यश मिळवले आहे. तिला त्यांनी त्याब्यात घेतले आहे.
ट्विंकल कोळी ची आई मनिषा किरण कोळी हीचा मात्र एक महीन्यापुर्वी बडलहगंज येथे रुग्णालयात उपचार घेत असतांना कोरोनामुळे मृत्यु झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे. तर, यावलचे दोन्ही पोलीस कर्मचारी त्या मुलीला सोबत घेवुन यावल येथे येण्यासाठी रवाना झाले आहेत.