खड्डा चुकवतांना रिक्षा उलटून दोघे ठार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रस्त्यावरील खड्डे चुकवतांना तालुक्यातील भोरटेकजवळ रिक्षा उलटून झालेल्या अपघातामध्ये रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथील महिला व पुरूष ठार झाले आहेत.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथील शुभम तायडे या युवकाचा विवाह निश्‍चीत झाला असून त्याच्या बस्त्यासाठी कुटुंबिय हे रिक्षाने भुसावळ येथे जात होते. दरम्यान, भोरटेक गावाजवळ रस्त्यावर पडलेला खड्डा चुकवतांना रिक्षा उलटून अपघात झाला. यात दिलीप दिनकर तायडे (वय ५०) आणि ज्योत्स्ना गोकुळ तायडे (वय४५) हे दोन जण जागीच ठार झाले असून तिघे जखमी झाले आहेत.

मयत दिलीप तायडे हे नवरदेवाचे वडील तर महिला ही काकू असल्याने तायडे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. हा अपघात रविवारी दुपारी भोरटेकजवळ झाला. यातील तिघा जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या संदर्भात फैजपूर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

Protected Content