आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत ‘विराट’चे 11 वर्षे पुर्ण

virat 1

नवी दिल्ली प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ‘रनमशीन’ विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला आज ११ वर्षे पूर्ण होत आहेत. हे सर्व क्षण आठवणीत असून त्याने पदार्पणाच्या सामन्यातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

याबाबत माहिती अशी की, ‘किशोर अवस्थेत असताना आजच्याच दिवशी २००८मध्ये प्रवासाला सुरुवात केली. जे मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं ते सर्व मला देवानं दिलं,’ असं विराटनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सध्या भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांची टी-२० मालिका भारतानं जिंकली आहे. तर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही २-० ने खिशात घातली आहे. या मालिकेतील एक सामना पावसामुळं रद्द झाला होता. आता दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना २२ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ११ वर्षांपूर्वी म्हणजेच आजच्या दिवशी विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात झाली. या प्रवासातील स्मृतींना त्यानं ट्विटच्या माध्यमातून उजाळा दिला आहे. १८ ऑगस्ट २००८ रोजी दांबुलामध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तो फोटोही त्यानं ट्विट केला आहे.

Protected Content