कट उधळला : दोन अतिरेकी ठार, तीन जवान शहीद

श्रीनगर-वृत्तसंस्था | लष्करी छावणीवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न जवानांनी उधळून लावला असून दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत.

जम्मू-काश्मिरच्या राजौरी परिसरात काल रात्री उशीरा दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. काही अतिरेक्यांना भारतीय लष्कराच्या छावणीत प्रवेश करण्याचा प्रयत्न यातून उधळून लावण्यात आला असून दोन दहशतवादी ठार झाले असून इतर पळून गेले आहेत.

दरम्यान, याच चकमकीत भारतीय सैन्यदलाचे तीन जवान देखील शहीद झाले असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. भारतीय जवानांनी लागलीच परिसरात व्यापक प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

Protected Content