ब्रेकींग न्यूज : भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार !

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा ते चिनावल दरम्यान असलेल्या कोचूर गावाजवळील स्मशानभूमीनजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. मयत झालेले दोघेजण चिनावल गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील सावदा ते चिनावल दरम्यान वीरेंद्र सुनील नेमाडे वय-२७ आणि त्यांच्यासोबत अनिल चुडामन मेढे वय-६० हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ एबी ११०१) सावद्याकडून चिनावल येथे जात असताना समोरून येणारी चारचाकी वाहन क्रमांक (एमएच १९ डीएम ०३५१०)ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील वीरेंद्र नेमाडे आणि अनिल मेढे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर चारचाकी वाहन बाजूच्या नाल्यात पडली. दरम्यान या चारचाकी वाहनातील कोणालाही दुखापत झालेले नाही, परंतु चालक हा गाडी सोडून पसार झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावदा पोलीस ठाण्याचे एपीआय जालिंदर पळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दोघांचा मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आला आहे. या घटनेबाबत सावदा पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content