खंडणीसाठी अपहरण करणार्‍यांना अटक

अमळनेर प्रतिनिधी । सहा लाखाची खंडणी उकळण्यासाठी दंत वैद्यकाचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना येथे घडली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहादा येथील विजय गोसावी यांना अंजली पटेल नावाच्या महिलेने मोबाइलवर संपर्क साधून वडिलांचे दात बसवण्यासाठी घरी बोलावले. त्यानुसार ते आपला मावसभाऊ तुषार जलालगीर गोसावी अमळनेर येथे गेले. तेथे त्यांनी या दोघांना घरात डांबून ठेवत मारहाण केली. तू एका व्यक्तीचे दात बसवल्यामुळे त्याचा मृत्यू झाला म्हणून तुला मारहाण करण्यास आमच्या साहेबांनी सांगितले आहे. त्यानंतर पिस्तूल लावून सहा लाखांची खंडणी मागितली. यावेळी विजय गोसावी यांनी अमळनेरात राहणारी त्यांची बहीण दीपाली दिनेश कोठारी यांच्याकडून पैसे आणून देण्याच्या बहाण्याने पळ काढला. यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून अरविंद रवींद्र बिर्‍हाडे (वय २०) व महेंद्र सीताराम मोरे (वय ४०) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य संशयित गोकूळ निंबाजी गाडगे (वय ३२) व त्याचा मावसभाऊ विनोद हे फरार झाले असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

Protected Content