ब्रेकींग : जळगाव जिल्हा कारागृहातून तीन कैद्यांचे पलायन

जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथील जिल्हा कारागृहातून आज सकाळी साडेसात वाजता तीन कैद्यांनी पलायन केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या कैद्यांमध्ये पोलीस दलातून बडतर्फ झालेल्या गुन्हेगाराचाही समावेश आहे.

नेहमी विविध कारणांनी चर्चेत असणार्‍या जिल्हा कारागृहात आज सकाळी तीन कैद्यांनी पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गोरव विजय पाटील रा.तांबापुरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाड अमळनेर) असे पळालेल्या आरोपींची नावे आहेत. सुशील मगरे हा पोलीस दलातून बडतर्फ झालेला आहे. पुणे येथील सराफ दुकानावर शस्त्रांचा धाक दाखवून त्याने दरोडा टाकला होता.

आज सकाळी साडेसातच्या सुमारास या तिन्ही कैद्यांनी पलायन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस प्रशासनाने त्यांचा तपास सुरू केला आहे. जिल्हापेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक अकबर पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तथापि, याबाबत अद्याप तक्रार नोंदविण्यात आली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

Protected Content