पाटणा- पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागले आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटरवर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “महाराष्ट्र शासन हे पुरोगामी शासन, आता ते हळूहळू प्रतिगामी व्हायला लागले आहे. कोरोना लॉकडाऊन उठवतांना केंद्राने अनेक गाइडलाइन्स दिल्या, परंतु महाराष्ट्र शासन त्यांना मान्य करायलाच तयार नाही. आरोग्य सेतूचे अॅप आले, त्यातून लोकांची तब्येत कशी आहे हे कळते. कोरोनाबाधित आहे की नाही हे कळते. परंतु महाराष्ट्र शासनाने अजुनही लॉकडाउन उठवला नाही, अशी परिस्थिती आहे. कदाचित या व्हिडिओनंतर उठवतील अशी परिस्थिती आहे.”