आज ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना

Team India ODI

 

मुंबई प्रतिनिधी । भारत आणि ऑस्ट्रेलिया या जागतिक क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुपारी २ नंतर रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

टीम इंडिया आजपासून ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारतात होणारी ही मालिका ३ सामन्यांची असणार आहे. वानखेडे स्टेडियमवर या दोन संघांमध्ये तब्बल १३ वर्षांनी एकदिवसीय रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या आधी १७ ऑक्टोबर २००७ मध्ये एकदिवसीय सामना रंगला होता. या सामन्यात भारताने २ गडी राखून ऑस्ट्रेलिया विरोधात विजय मिळवला होता. त्याआधी दोन वेळा वानखेडेवरील मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती.

मालिकेचे वेळापत्रक

१४ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, पहिला एकदिवसीय सामना (मुंबई)
१७ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, दुसरा एकदिवसीय सामना (राजकोट)
१९ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, तिसरा एकदिवसीय सामना (बंगळुरू)

Protected Content