जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आयईईई बॉम्बे सेक्शन द्वारा दरवर्षी राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शन (टेक्नोवेशन) आयोजित करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून यावर्षी देखिल गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आईईई टेक्नोवेशन २०२५ या टेक्निकल इव्हेंटचे आयोजन करण्यात आले. टेक्नोवेशन हा एक राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट एक्सपो आहे. त्यामध्ये व्हीएलएसआय, रोबोटिक्स, सायन्सेस, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यासारख्या थीम अंतर्भूत असतात.
या वेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे(स्टुडन्ट ब्रांच कौन्सिलर), कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.विजय डी चौधरी तसेच सदर कार्यक्रमास डॉ.स्वप्नाली माकडे(फादर रॉड्रिग्ज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, मुंबई), प्रा. महेश एन पाटील हे परिक्षक म्हणून उपस्थित होते. टेक्नोवेशन २०२५ हा कार्यक्रम स्टुडन्ट ब्रांच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय मार्फत घेण्यात आला. सुरुवातीला दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात महाविद्यालयाचे डॉ. विजय डी चौधरी यांनी टेक्नोवेशन संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. व अशा प्रकारच्या स्पर्धे मधून विद्यार्थ्यांना त्यांचे टॅलेंट दाखवण्याची संधी मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. डॉ.हेमंत इंगळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना टेक्नोव्हेशन संदर्भात संपूर्ण माहिती दिली.
महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व त्यांची गुणवैशिष्ट्ये वाढीस लागण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम सदोदित घेतले जातील हे नमूद केले.त्यानंतर डॉ. स्वप्नाली माकडे यांनी टेक्नोवेशन बद्दल बोलताना राबवीत असलेल्या अनेक उपक्रमांची माहिती दिली. तसेच स्पर्धेच्या नियमाबद्दल सांगितले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी त्यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी, सिम्पलीसिटी, कोर व्हॅल्यूज, हुम्यानिटी या सर्व गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे जेणेकरून ती भविष्यामध्ये यशस्वी होतील.
या कार्यक्रमात जवळपास २२ वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स च्या माध्यमातून ९० विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. तसेच ही स्पर्धा वेगवेगळ्या जिल्ह्यातील जसे की जळगाव, बुलढाणा, जालना, अकोला, वाशिम, धुळे व नंदुरबार, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व वर्धा येथील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली. विजेते विद्यार्थी त्यांच्या प्रोजेक्टला अंतिम फेरीतील प्रोजेक्ट कॉम्पिटिशन साठी श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर येथे सादरीकरणास नेणार आहे. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विजय डी चौधरी यांनी प्रा. हेमंत इंगळे व डॉ. विजयकुमार पाटील यांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उस्फूर्त प्रतिसाद नोंदविला.कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील सचिव व डॉ. केतकी पाटील, अनिकेत पाटील (सदस्य) यांनी कौतुक केले व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी सूत्रसंचालन नीलाक्षी बर्डे, खुशबू पाटील, तुळजा महाजन व हेमांगी बावा या विद्यार्थिनींनी केले.