अमरावती प्रतिनिधी | ठाकरे सरकारमधील चार मंत्र्यांविरोधातील तक्रारी विविध तपास यंत्रणांना दिल्या असून चार मंत्र्यांची चौकशी होऊन घोटाळे उघडकीस येणार गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांनी केला आहे.
अमरावती येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी फतवा जाहीर करत किरीट सोमय्या यांचा दौरा रद्द केला होता मात्र आज मंगळवारी दौऱ्यावर असतांना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढण्याची जबाबदारी जनतेने मला दिली असल्याचे सांगत चार मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस येणार असल्याचे खळबळजनक विधान केले.
ज्या चार मंत्र्यांची चौकशी होणार आहे यापैकी शिवसेनेचे दोन, विदर्भातील काँग्रेसचे एक कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याची देखील चौकशी होईल असा सूचक इशारा सोमय्या यांनी दिला असला तरी नावे गुलदस्त्यात ठेवल्याने जनसामांन्यात तर्कवितर्क लढविले जात आहे.