भाजपकडून तोडफोडीचे राजकारण- संजय राऊत

sanjay raut 3

मुंबई प्रतिनिधी । केंद्र व राज्यातील सत्ताधारी हे फोडाफोडीचे राजकारण करत असून शिवसेना महाराष्ट्रात असे काहीही घडू देणार नसल्याचा दावा आज शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. राज्यात शिवसेनेचेच सरकार येणार असल्याचा पुनरूच्चारदेखील त्यांनी केला.

खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन ताज्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले की, केंद्र व राज्यात सत्तारूढ असणारा भारतीय जनता पक्ष हा फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. मात्र शिवसेनेचे आमदार याला भीक घालणार नाही. इतर पक्षाच्या आमदारांना आमीष दाखविण्यात येत असले तरी शिवसेनेच्या आमदार्‍यांच्या वार्‍यालाही भाजप उभे राहू शकत नाही. हा प्रकार आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली. तर महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावादेखील राऊत यांनी केला.

Protected Content