आकाशवाणी चौकाला भारतरत्न, स्व.अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव द्या – ‘भाजयुमो’ची मागणी

जळगाव प्रतिनिधी | जळगाव येथील आकाशवाणी चौक याला भारतरत्न, स्व.अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे या आशयाचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव यांच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

या निवेदनात, “भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर यांच्या वतीने आणि जळगाव शहरातील असंख्य युवकांकडून विनंती करण्यात येते की जळगाव शहरातील आकाशवाणी चौकाला भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे.

ते भारताची तीन वेळा पंतप्रधान होते त्यांनी राष्ट्रीय भावना प्रेरित अशा राष्ट्र धर्म, पांचजन्य आणि वीर अर्जून या पत्रपत्रिकेचं संपादनपण केलं असून अशा समाजसेवक भारतरत्न, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव आकाशवाणी चौकाला देण्यात यावे”

अशी विनंती भारतीय जनता युवा मोर्चा जळगावतर्फे जिल्हा महानगरचे जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे यांनी निवेदनाद्वारे जळगाव जिल्हाधिकारी यांना केली आहे.

Protected Content