मविआने मला संपविण्याचा प्रयत्न केला ! : फडणवीस

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर अतिशय गंभीर आरोप केला आहे.

काल काल उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखांसोबत मेळावा पार पडला. यावर आज देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून टीका केली आहे. ठाकरे यांच्या सभेत काहीच दम नव्हता अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली. ते म्हणाले की, कालच्या भाषणातून उद्धव ठाकरे यांचं नैराश्य दिसलं. त्यांनी त्यांच्या भाषणात आमच्यावर टीका केली पण ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यावेळी तुम्ही का राजीनामे दिले नाहीत? असा प्रश्‍न त्यांनी विचारला.

दरम्यान, फडणवीस म्हणाले की, मागच्या अडीच वर्षे महाविकास आघाडीने मला संपवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मला संपवू शकत नाहीत असं फडणवीस म्हणाले आहेत. दरम्यान, आज एनआयए आणि एटीएसने राज्यातील जवळपास २० ठिकाणांवर छापेमारी केली आहे. तर या कारवाईवर सध्या बोलणं उचित ठरणार नाही कारण ही कारवाई आणि चौकशी अजून सुरू आहे असंही ते म्हणाले.

Protected Content