जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण

kolhapur jotiba

 

कोल्हापूर वृत्तसंस्था । जम्मू काश्मीरच्या राजुरीमध्ये दहशतवाद्यांसोबत आज (दि.16) झालेल्या चकमकीत महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. जोतिबा चौगले असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जोतिबा चौगले हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावचे रहिवासी होते. जोतिबा चौगले हे 2009 साली सैन्यदलात दाखल झाले होते. जम्मूमध्ये राजुरी येथे ते कार्यरत होते. आपले कर्तव्य पार पाडत असताना अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत चौगले यांना वीरमरण आले. उद्या दुपारी महागाव येथे चौगले यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर ही बातमी समजताच चौगले घरावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, 20 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या परमेश्वर बाळासाहेब जाधवर या पुत्रालाही वीरमरण आले होते.

Protected Content