डे-नाईट कसोटी सामन्यासाठी टीम तयार – कोहली

virat kohli

मुंबई प्रतिनिधी । बांगलादेशविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. उद्यापासून कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघ आपला पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळणार असून यासाठी टीम सज्ज असल्याचे कोहलीने म्हटलं आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये वैविध्य आणण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. मी काही दिवसांपूर्वी गुलाबी चेंडूवर सराव केला. हा चेंडू पारंपरिक लाल चेंडूपेक्षा जास्त वळतो. या चेंडूवर खेळत असताना तुम्हाला अधिक लक्ष देऊन खेळणं गरजेचं आहे. विराटने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. यावेळी बोलत असताना बांगलादेशच्या संघाला हलकं लेखण्याची चूक आपण करणार नसल्याचंही विराट कोहली म्हणाला. तो पहिल्या कसोटी सामन्याआधी पत्रकारांशी बोलत होता.

Protected Content