मुंबईचं काय होणार देवालाच माहित ! -कंगनाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई प्रतिनिधी । ”पुलवामा हल्ल्यात इतके जवान नाही मारले गेले जितके निष्पाप तुमच्या निष्काळजीपणामुळे गेलेत. मुंबईचं काय होणार देवालाच माहित ?” असे नमूद करत कंगना राणावत हिने आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टार्गेट केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने भिवंडी इमारत दुर्घटनेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीक केली आहे. माझ्या घरावर बेकायदेशीरपणे कारवाई केली जात होती. त्यावेळी तेवढं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर जवळपास ५० लोक जिवंत असते असं कंगनाने म्हटलं आहे. कंगनाने ट्विटरच्या माध्यातातून टीका केली असून यावेळी तिने दुर्घटनेची तुलना पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी केली आहे.

कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे, संजय राऊत.. जेव्हा माझं घर बेकायदेशीरपणे तोडलं जात होतं, तेव्हा तितकं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर आज जवळपास ५० लोक जिवंत असते. पाकिस्तानने केलेल्या पुलवामा हल्ल्यात इतके जवान नाही मारले गेले जितके निष्पाप तुमच्या निष्काळजीपणामुळे गेलेत. मुंबईचं काय होणार देवालाच माहित ! असे यात म्हटले आहे.

Protected Content