बेपत्ता तरूणी अखेर घरी परतली

जळगाव प्रतिनिधी । कुटुंबियांसोबत झालेल्या वादातून आपल्या बाळाला घेऊन घरून निघून गेलेली तरूणी पुन्हा आपल्या घरी परतील आहे.

याबाबत वृत्त असे की, सासरच्या लोकांशी भांडण झाल्याने एक तरूणी १६ फेब्रुवारी रोजी आपल्या सहा महिन्यांच्या मुलीसह घरातून निघून गेली होती. पतीसह सासर व माहेरच्या लोकांनी तीन दिवस तिचा शोध घेतला. यानंतर १९ फेब्रुवारी रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद केली होती.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, रामानंदनगर पोलिस ठाण्याचे अनिल बडगुजर, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, संदीप साळवे, अनमोल पटेल, महिला पोलिस कर्मचारी वळवी यांनी शोध सुरू केला. या विवाहितेची एक मैत्रीण शिरपूर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी काढली. यानंतर पथकाने थेट शिरपूर गाठले. या वेळी संबंधित विवाहिता तिच्या घरी आढळून आली.

या तरूणीचा प्रेमविवाह झाला असून तिचे पती व सासरच्या मंडळींशी वाद होत असल्याने तिने घर सोडले होते. तथापि, पोलिसांनी वेळीच तपासचक्रे फिरवल्यामुळे ही विवाहिता अवघ्या १२ तासात सुखरूप परतली.

Protected Content