Jalgaon जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय बौद्ध साहित्य परिषदेशी संलग्न असणार्या बौद्ध साहित्य प्रसार संस्थेतर्फे तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे जळगावात आयोजन करण्यात आले आहे.
संत चोखामेळा वसतीगृहात झालेल्या बैठकीत जळगावात तिसरे राज्यस्तरीय बौध्द साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. भारतीय बौद्ध साहित्य परिषद संलग्न बौद्ध साहित्य प्रसार संस्थेतर्फे हे अधिवेशन होणार असल्याची माहिती बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा. भरत आत्माराम शिरसाठ यांनी दिली.
या नियोजन सभेच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक राजेंद्र पारे हे होते. डॉ. सत्यजित साळवे यांनी भूमिका मांडली. प्रा. नरेंद्र गायकवाड यांनी साहित्य संमेलनासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीवर सविस्तर प्रकाश टाकला. याप्रसंगी धनराज मोतीराय, रणजित सोनवणे, हेमेंद्र सपकाळे, युवराज वाघ आदी मान्यवरांची उपस्थिती होती.