दुहेरी खून प्रकरणातील आरोपी गजाआड

जळगाव प्रतिनिधी । शहराला लागून असणार्‍या कुसुंबा येथील दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे तिघांना अटक केली असून व्याजाच्या रकमेच्या वादातून या दोघांची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी तपासात आढळून आले आहे.

याबाबत वृत्त असे की, कुसुंबा येथील ओमसाई नगरात राहणार्‍या तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याचा अलीकडेच खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता पाटील दाम्पत्याच्या व्याजाच्या व्यवसायातून हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले होते. या दिशेने तपास केला असता आरोपींची खातरजमा करण्यात आला. यानंतर आज पहाटे चार वाजता तिघांना अटक करण्यात आली आहे.

पाटील दाम्पत्याच्या खून प्रकरणी सुधाकर रामलाल पाटील (४०, चिंचखेडा,ता.जामनेर), देविदास नामदेव पाटील (४०) व अरुणाबाई गजानन वारंगे (३०) यांना अटक करण्यात आली आहे. अरुणाबाई व देविदास यांना कुसुंब्यातून तर सुधाकर याला चिंचखेडा येथून ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

व्याजाच्या रकमेच्या वादातून या दोघांची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी तपासात आढळून आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील अन्य पैलू देखील तपासात समोर येण्याची शक्यता आहे.

Protected Content