विशाखापट्टणम कसोटीत भारताचा आफ्रिकेवर २०३ धावांनी विजय

India Team 1 784x441

 

विशाखापट्टणम (वृत्तसंस्था) भारताने कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी दणदणीत विजय मिळविला आहेत.

 

दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात मोहम्मद शमी (५/३५) आणि रवींद्र जडेजा (४/८७) यांनी सर्वाधिक बळी मिळवत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी ९ बळींची आवश्यकता होती. लय सापडलेल्या टीम इंडियाने दिवसाच्या दोन सत्रांमध्येच हा विजय आपल्या नावे केला. भारताने मालिकेत १-० अशी विजयाची आघाडी घेतली आहे. दिवसाच्या पहिल्याच सत्रात मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांच्या घातक फिरकी गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेचे एक मागोमाग एक असे ७ फलंदाज तंबूत धाडले. विजयासाठी केवळ दोनच बळी दूर असताना भारताने दुसऱ्या सत्रात २२ षटके फेकत या सामन्यावर आपले नाव कोरले. या सामन्यात ८ बळी मिळवणारा रविचंद्रन अश्विनने सर्वात जलद बळी मिळवण्याच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी साधली.

Protected Content