सत्ता आली तर सरसंघचालकांना दिवसासाठी तरी जेलमध्ये टाकू : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar And Mohan Bhagwat

जालना (वृत्तसंस्था) सत्ता आली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांना दोन दिवसासाठी तरी जेलमध्ये टाकू,असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. औरंगाबाद येथील मुस्लीम समाज कार्यकर्ता प्रवेश सोहळा आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

औरंगाबाद येथील मुस्लीम समाज कार्यकर्ता प्रवेश सोहळा आयोजित कार्यक्रमात बोलतांना प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, बिहारमधील एका खासदाराला एके 47 बाळगल्याप्रकरणी जेलमध्ये जावे लागले होते. मोहन भागवत यांच्याकडेही एके 47 आहे. त्यांच्याकडे एके 47 कशी आली? हे जर ते सांगू शकले नाहीत. तर त्यांनाही जेलमध्ये पाठवू, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

Protected Content