नितेश राणेंवर गुन्हा दाखल करा : तृतीयपंथी आक्रमक

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करतांना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी तृतीयपंथी समुदाय आक्रमक झाला आहे.

 

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे मॉर्फ केलेला फोटो ट्विट करत ‘मर्दानगी वर कलंक ! *च्या प्रमुखांकडुन अजुन काय अपेक्षा.. बायला कुठला !’ अशी टीका केली होती. यावरून ते वादाच्या भोवर्‍यात सापडले असून तृतीयपंथीय समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन समोर तृतीयपंथीय समाजातील आंदोलनकर्त्यांनी नितेश राणे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

 

तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या राज्य समन्वयक शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास देखील टाळाटाळ करत असल्याचा आरोप शमीभा पाटील यांनी केला आहे. तर पोलिसांनी दडपशाही करून माझ्या आंदोलक भगिनी यांना जर काही झालं तर याला पुणे पोलीस जबाबदार असतील, असे शमीभा पाटील म्हणाल्या.

Protected Content