हारतुरे नको,शेतकऱ्यांना मदत द्या ; वाढदिवसानिमित्त राजीव देशमुख यांचे आवाहन

rajiv deshmukh chalisgaon

चाळीसगाव, प्रतिनिधी | नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी आणि हितचिंतक या सर्वांनीच आपल्या वाढदिवसाला कुठलेही हारतुरे, शुभेच्छापत्र, भेटवस्तू न आणता शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करावी असे आवाहन माजी आमदार तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजीवदादा देशमुख यांनी केले आहे.

दरवर्षी दि. ३० नोव्हेंबर रोजी राजीवदादा देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. परंतु, यंदाचा हा वाढदिवस साध्यापद्धतीने साजरा करण्याचे ठरवले असल्याची त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते व स्नेहीजणांनी यांनी वाढदिवसाला कोणतेही जाहीर कार्यक्रम न घेण्याविषयी त्यांनी कळविले आहे.चाळीसगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून शेतकरी संकटात आहे. मागील वर्षी कमी पाऊस तर यंदा अतिवृष्टी अशा दुहेरी कात्रीत सापडलेला बळीराजा त्याला सावरण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यामुळे वाढदिवस साजरा न करता राजीवदादा देशमुख यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

Protected Content