मुक्ताईनगर मध्ये सतत येजा होत असलेल्या वीजमुळे नागरिकांचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर मध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी लागली होती त्यावेळेस अर्धे मुक्ताईनगर २४ तास अंधारात होते. तदनंतर वीस पुरवठा सुरळीत झाल्यानंतर मुक्ताईनगर शहरांमध्ये सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे मोठमोठ्या व्यवसायिकांचे फ्रिज एसी कम्प्युटर डिवाइस इत्यादी उपकरणांना मोठ्या संख्येत फटका बसलेला आहे.

वीज सुरळीत झाल्यानंतर विजेचा लपंडाव का सुरू आहे असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. भर दिवसा व रात्री विजेचा लपंडाव सतत सुरू असतो त्यामुळे ऑफिस कर्मचाऱ्यांपासून तो व्यवसायिकांपर्यंत सर्वांना याचा फटका बसत आहे तसेच बालक व वयोवृद्ध नागरिकांना सुद्धा याचा त्रास सोसावा लागत आहे.

Protected Content