चाळीसगाव प्रतिनिधी । येथील वैभव मंगल कार्यालयात माजी केंद्रीय मंत्री खासदार सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत भाजपचा बुथ कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला.
या मेळाव्याला खा. सुभाष भामरे यांच्यासह खासदार उन्मेष पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस कैलास सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, जि.प. सभापती पोपट भोळे, रवींद्र पाटील, मंगला जाधव, राजेश राठोड, उद्धवराव महाजन, देवयानी ठाकरे, धर्मा वाघ, चित्रसेन पाटील, सतीश दराडे, संजय भास्कर पाटील, संजय रतन पाटील, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. सुनील निकम यांनी केले. आभार धनंजय मांडोळे यांनी मानले.
याप्रसंगी खासदार डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास ठेवला. पाच वर्षात जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या. यामुळे २०१९च्या निवडणुकीतही भाजप पुन्हा सत्तेत आला. तर आता राज्यातही भाजपलाच सत्ता मिळणार असल्याचे प्रतिपादन डॉ. भामरे यांनी केले.